Monday 26 May 2014

त्रिपुरा रहस्य: चैतन्य म्हणजे काय ? (भाग ४ था)



त्रिपुरा रहस्य: चैतन्य म्हणजे काय ? (भाग ४ था)
              ब्रह्मराक्षस राजपुत्रास माणसाचे  अत्त्युच्य गुण १२ व्या प्रश्नात विचारतो,
१२)निर्भय कोण?  दुर्दशेपासून मुक्त कोण? गरज मुक्त कोण?”
राजपुत्र उत्तर देतो,
ह्या तीनही गुणांचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होय.
उत्तर :          अनासक्त माणूस निर्भय असतो.
                            स्वातंत्रवीर सावरकरांची फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ इंग्रजांच्या कैदेतून सुटण्यासाठी जहाजातून समुद्रात मारलेली उडी त्यांची अनासक्त वृत्ती व त्यातून येणारी निर्भयता दर्शविते.
उत्तर :        मनावर सयंम असणारा माणूस दुर्दशेपासून मुक्त असतो.
                            अंदमानातील जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावकरांना तेल काढण्याच्या घाण्याला बैलासारखे जुंपले होते. त्यांची खोली फाशीच्या वधस्तंभासमोरील होती. स्वातंत्र्ययुद्धातील सहकाऱ्यांना फाशी देताना पाहून स्वातंत्र्यवीरांना मानसिक यातना व्हाव्यात, हा ब्रिटिश सत्तेचा हेतू.
                            परंतु अतिशय संयमी वृत्तीने त्यांनी ही काळ्या पाण्याची शिक्षा उपभोगली. अंदमान कारागृहातील कैद्यांमध्ये त्यांनी हिंदू मुस्लीम हा भेद दूर केला स्वतः उर्दू शिकले, कुराण शिकले. इंग्रजी सत्तेच्या प्रचंड जुलमातही त्यांनी कैद्यांचे मनोधैर्य खच्ची हो वू दिले नाही अट्टल गुन्हेगारांना सन्मार्गाला आणले. एवढेच काय स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अन्याय करणारे इंग्रजी अधिकारीही स्वातंत्रवीरांना मानू लागले, त्यांचा आदर करायला लागले.
उत्तर :    स्वतःला ओळखणारा माणूस कधीच गरजू नसतो.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदमान तुरुंगात प्रवेश केल्यावर तेथील आयरीश तुरुंगाधिकाऱ्यानेबारी साहेबाने त्यांना विचारले, “सावरकर तुम्हाला माहित आहे का? आता ५० वर्षे तुमची इथून सुटका नाही.”
                           सर्वसामान्य माणूस ५०वर्षे गजाआड ह्या कल्पनेने ठेपाळला असता परंतू त्यांचे उत्तर हे त्यांच्या स्वतःवरच्या स्वतः हाती घेतलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या पवित्र कामावरील विश्वासाचे प्रतिक दिसते.
                      ज्या निर्दयी अधिकाऱ्याच्या हातात स्वतःचे आयुष्य कंढायचे आहे, त्याला सावरकर सांगतात तुमची इंग्रजी सत्ता ५०वर्षे आमच्या देशात रहाणार आहे काहे खरोखरच गरजमुक्ततेचे उदाहरण म्हणावयास पाहिजे
--------------------------------------------------------------- 
ब्रह्मराक्षस राजपुत्रास १३व्या प्रश्नात एकाच व्यक्तीत देह आहे व नाही ही संकल्पना विचारतो,
13) अशी व्यक्ती कोण जी देहाने दिसते पण ती देहरहित असते.
        निष्क्रीय क्रिया म्हणजे नक्की काय?”
राजपुत्र उत्तर देतो,
      “ जीवनमुक्त व्यक्ती दिसते परंतू ती देहरहित असते.
         त्याच्या क्रिया हीच निष्क्रीय क्रिया होय.” ह्यालाच भगवद् गीतेत निष्काम कर्मयोग म्हटलेले आहे.

जीवनमुक्त, निष्काम कर्मयोगी व्यक्ती आदरणीय बाबा आमटे यांच्या रुपात आपण पाहिलेली आहे.
                         बाबा आमटे व त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेमध्ये आपले देह आयुष्य झोकून दिले. ह्यातून त्यांनी आपली प्रसिद्धी, मानमरातब किंवा सरकार दरबारी आपली नोट वटावी, ही अपेक्षा बाळगली नाही. ह्यातूनच त्यांचे निष्क्रिय व्रत दिसून येते. त्यांच्या पुढील पिढीनेही हे असितधारा व्रत स्विकारलेले दिसत आहे.
--------------------------------------------------------------- 
ब्रह्मराक्षस राजपुत्रास सांगतो,
शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दे आणि तुझ्या भावाला घेऊन जा.”
14)ह्या जगात सत्य काय आहे? आभासी काय आहे ?
      आणि अनुचित कशाला म्हणायचे ?”
राजपुत्र उत्तर देतो,
        आत्मा सत्य आहे. आत्माविरहीत सर्व गोष्टी ह्या आभासी आहेत.
        सांसारीक व्यवहार हे अनुचित आहेत.”
---------------------------------------------------------------
                         अशाप्रकारे राजपुत्राने सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यावर ब्रह्मराक्षसाने त्याच्या भावाला आनंदाने सोडून दिले. त्या ब्रह्मराक्षसाच्या जागी एक तेजपुंज ब्राह्मण राजपुत्रासमोर उभा राहिला. ह्या ब्राह्मणाला पाहिल्यावर दोन्ही राजपुत्रांनी त्या ब्राह्मणाला  आश्चर्याने विचारले, “आपण कोण?”
                   ब्राह्मणाने सांगितले मी मूळचा मगध देशातला, माझे नाव वसूमनमी खूप शास्त्र शिकलेला व वाद विवादात निपूण असा ब्राह्मण होतो. मला स्वतःविषयी खूप अभिमान होता. एकदा राजाने आमच्या देशात सर्व विद्वान शास्त्री लोकांची सभा घेतली  ह्या सभेला अष्टक नावाचा थोर संत, अत्यंत हुशार व ज्ञानी माणूस आलेला होता
                         मी स्वतः वाद विवादपटू असल्याने मी त्याच्याशी आपण स्वतः कसे परिपूर्ण असतो ? म्हणून जोरजोरात वाद घातला. त्याने त्याचे म्हणणे पवित्र अशी शास्त्र वचने सांगून मला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मला सभा जिंकायची होती, त्यामुळे मी माझेच म्हणणे जोरदार मांडत राहिलो. मी माझे म्हणणे सुधारत नाही हे पाहून तो शांत राहिला. परंतू माझ्या उद्धटपणाने त्याचा एक कश्यप गोत्री शिष्य संतापला. त्याने मला राजासमोर शाप दिला, “अरे मूर्ख ब्राह्मणा, माझ्या गुरुंचे म्हणणे समजावून न घेता, तू त्यांच्याशी वाद घालण्याची हिंमत कशी केलीस? तू ह्या क्षणापासून ब्रह्मराक्षस बनून जगशील.”  मी घाबरलो आणि त्या संत अष्टकाचे पाय धरले. तो आत्मज्ञानी असल्याने त्याने आपल्या शिष्याच्या शापावरील उःशाप दिला. त्याला माझी दया येऊन तो म्हणाला आताच्या तुझ्या वाद विवादात मी तुला तुझ्या प्रश्नांची दिलेली उत्तरे तुला एखाद्या आत्मज्ञानी व्यक्तीकडून परत मिळतील. आत्ता वादाच्या नादात तू त्या उत्तरांकडे दुर्लक्ष केलेपरंतू हा आत्मज्ञानी माणूस तुझे योग्य उत्तरांद्वारे समाधान करेल, तेव्हा तू शापमुक्त होशील. राजपुत्रा तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊन मला शापमुक्त केलेस व मला परत जीवन दान दिलेस.
                     ब्रह्मराक्षसाचा परत वसूमन ब्राह्मण होणे हा दत्तगुरुंच्या विषय सोपा करुन सांगण्यासाठी केलेला ल्पनाविलास आहे. येथे कोणतीही मनाला न पटणारी अद् भूतता दिसून येत नाही.
                      ब्रह्मराक्षसाचे रुपांतर झालेला वसूमन ब्राह्मण राजपुत्रास विचारतो, तू एवढा मोठा ज्ञानी माणूस असून शिकारीला कसा जातोस? काम आणि शहाणपणा ह्या दोन्ही विरुद्ध गोष्टी आपण मानतो.”
                            राजपुत्र शहाणपणाची जरुरी स्पष्ट करण्यासाठी आकाशाचे उदाहरण देतो. अज्ञानी माणसाला आकाशापलिकडचे रंगहीन अवकाश माहीत नसते, तो आकाशाचा रंग निळा आहे सांगतो. ज्ञानी माणसाला रंगहीन अवकाश माहीत असले तरी तो मनात कोणताही संभ्रम न ठेवता आकाशाचा रंग निळा आहे सांगतो. त्यामुळे तुमच्याकडे असणारे हे अवकाशाचे शहाणपण तुमच्या कामात व अज्ञानी माणसाच्या कामात फरक करीत नाही. तुमच्याकडे असलेले अवकाशाचे ज्ञान जरुर पडली तर कामात मदत करु शकते, परंतू काम केल्याने शहाणपण निरुपयोगी होत नाही.
                        शहाणपण हे शाश्वत व नैसर्गिक आहे ते कामाच्या विरुद्ध कसे असेल? काम जर शहाणपणास निरूपयोगी करत असेल तर शहाणपण व स्वप्न ह्यांच्यात फरक काय राहिला ?
                    ज्ञानी माणसाचे काम हे आरशासारखे स्वच्छ असते. ज्ञानी माणसाकडे खरे ज्ञान असते, त्यामुळे तो बिनचूक निष्कर्ष काढतो. अज्ञानी माणसाच्या संकल्पना अस्पष्ट असतात त्याचे निष्कर्ष पूर्वग्रहदूषित असतात.
                       पूर्ण अज्ञानी माणसाची चुकीची माहिती सुधारता येते.
ह्याचाच अर्थ   त्या कोऱ्या पाटीवर लिहिता येते.
परंतू चूकीने मिळविलेली माहिती सहजासहजी सुधारता येत नाही.
तुकाराम महाराज म्हणतात,
नाही मन निर्मळ काय करील साबण
हेच खरे.
                      वसूमन ब्राह्मणाचे समाधान होते तो व दोघे राजपुत्र एकमेकांना नमस्कार करुन आपा आपल्या घरी जातात श्रीदत्तगुरुंची गोष्ट जीवनाची मुलभूत तत्वे सांगून संपते.
समाप्त

॥श्रीगुरुदेव दत्त॥

त्रिपुरा रहस्य: चैतन्य म्हणजे काय? (भाग ३ रा)


त्रिपुरा रहस्य: चैतन्य म्हणजे काय?                    (भाग ३रा)
ब्रह्मराक्षस राजपुत्रास आपल्या दुसऱ्या प्रश्नाव्दारे  चैतन्य, स्फुरणे, आत्मा ह्या पहिल्या प्रश्नातील शब्दांविषयी विचारतो,
) “चैतन्य   एकाच वेळेला अवकाशापेक्षा विस्तृत व जगातील सर्वात सूक्ष्म गोष्ट कशी?  स्फुरणे म्हणजे काय?  तसेच आत्मा  म्हणजे काय?”
राजपुत्र उत्तर देतो,
चैतन्य हेच सर्वाला कारण असल्याने विस्तृत आहे  व आकलन होण्यास कठीण असल्याने सूक्ष्म आहे.
चैतन्याची आपल्याला जाणीव होते म्हणजे चैतन्य स्फुरते.
हेच जाणीव होणारे चैतन्य म्हणजे आत्मा होय.”
                               चैतन्य म्हणजे नक्की काय? हे आपल्याला सर्वसामान्य माणसाला समजत नाही. आधुनिक विज्ञानालाही अजून चैतन्य म्हणजे काय? ते येते कोठून? व जाते कोठे? हे समजलेले नाही. विज्ञान हे चैतन्य शोधण्याचा अविरत प्रयत्न करीत आहेचैतन्य संपले की आपला प्राण आपल्याला सोडून जातो. देह नावाचे यंत्र बंद पडते.
                                  चैतन्य सर्व सृष्टी संचलित निश्चित करते, म्हणून अवकाशाहूनही विस्तृत आहे, असे श्रीगुरुदेव म्हणतात.
                      चैतन्य म्हणजे नक्की काय? हे आपल्याला सांगता येत नाही व दिसत नाही म्हणून श्रीगुरुदेव ह्या चैतन्यास सूक्ष्माहूनही सूक्ष्म गोष्ट आहे, असे सांगतात.   प्रत्येकाच्या शरीरात  चैतन्य आहे परंतू ते आपल्याला एखाद्याच व्यक्तीमध्ये अनुभवायला येते, ह्याचाच अर्थ ते चैतन्य स्फूरते. तेव्हांच त्याचे अस्तित्व जाणवते, ह्यास श्रीगुरुदेव आत्मा म्हणतात.
-------------------------------------------------------------- 
ब्रह्मराक्षस  राजपुत्रास तिसरा प्रश्न विचारतो,
) “हे चैतन्य सापडण्याचे ठिकाण कोणते?  ते प्राप्त कसे होते?
      त्याच्या प्राप्तीपासून फळ काय मिळते?”
बुद्धी हेच चैतन्याच्या अस्तित्वाचे ठिकाण आहे.
एकाग्रतेने हे चैतन्य  प्राप्त होते .
चैतन्य  प्राप्त झाल्याने पुन्हा जन्म होत नाही.”
--------------------------------------------------------------- 
  ब्रह्मराक्षस  राजपुत्रास  ४था  प्रश्न  विचारतो,
 )”चैतन्याचे अस्तित्व दिसते परंतू त्याची जाणीव का होत नाही?
      जन्म म्हणजे नक्की काय?”
राजपुत्र उत्तर देतो,
अज्ञानामुळे आपल्याला ह्या चैतन्याची जाणीव होत नाही
आत्मा कळण्यासाठी स्वतः स्वतःला ओळखायला पाहिजे, त्यासाठी दुसऱ्या कोणत्याही बाह्य मदतीची गरज नाही
आपल्या देहाला आत्मा मानणे म्हणजे जन्म होय.”
--------------------------------------------------------- 
ब्रह्मराक्षस ५वा प्रश्न विचारतो,
)”चैतन्याची जाणीव होते परंतू ते आपल्याला समजत नाही असे का
    जन्म कशामुळे होतो?”
राजपुत्र उत्तर देतो,
अविवेकामुळे आपल्याला हे  चैतन्य समजत नाही.
कर्तृत्वाचा अभिमान धरल्याने जन्म प्राप्त होतो.”
--------------------------------------------------------
ब्रह्मराक्षस राजपुत्राच्या वरील उत्तरातील अविवेक म्हणजे काय हे ६व्या प्रश्नात विचारतो,
) “अविवेक म्हणजे काय? आपण स्वतः म्हणजे निश्चित कोण ?
     कर्तृत्वाचा अभिमान म्हणजे काय?”
 राजपुत्र सांगतो,
अविवेक म्हणजे स्वतःचा देह व आत्मा हे दोन्ही निराळे आहेत, हे न ओळखता येणे
आपण कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर तुझे तूच आपल्या स्वतःला विचार.
मी कर्ता  म्हणजे अहंकार ह्यालाच कर्तृत्वाचा अभिमान किंवा मीपणा म्हणतात.”
---------------------------------------------------------------
ब्रह्मराक्षस  ७वा राजपुत्रास विचारतो,
) अविवेक कशाने नष्ट होतो? ह्या सर्व विचाराचे मूळ कोणते व ह्या  
       मुळाचे कारण काय?”
राजपुत्र ब्रह्मराक्षसास  उत्तर देतो,
स्वच्या शोधातून अविवेक नष्ट करता येतो.
वैराग्यवृत्तीतून स्वचा शोध घेता येतो.
जीवन आनंदात न रमणे अनिच्छा असणे म्हणजे वैराग्य”.
--------------------------------------------------------------
ब्रह्मराक्षस  राजपुत्रास  ८वा  प्रश्न  विचारतो,
  ) स्वचा शोध, वैराग्य आणि आनंदाविषयी अनिच्छा म्हणजे काय ?”
स्वचा शोध हा स्वतःच्या परिक्षणातून घेता येतो.
ह्या परिक्षणात आत्मा व देह ह्यातील भेद जाणला पाहिजे. आत्मा जाणण्यासाठी शिस्तबद्ध, प्रामाणिक, मजबूत प्रयत्नांची गरज असते.
वैराग्य वृत्ती म्हणजे आपल्या भोवतालच्या विश्वात न गुंतणे. आसक्तीतून येणारी दुर्दशा आपल्याला समजली की वैराग्यवृत्ती म्हणजे आनंदाविषयी अनिच्छा निर्माण होते.”
------------------------------------------------------
ब्रह्मराक्षस राजपुत्रास ९वा प्रश्न विचारतो,
) ह्या सर्व गरजांचे मूळ कारण कोणते?
राजपुत्र उत्तर देतो,

 “दैवी कृपा हेच ह्या सर्व चांगल्या गोष्टींचे मूळ कारण आहे.
 परमेश्वराच्या भक्तीतून त्याची  प्राप्ती होते.
शहाण्या माणसाच्या सहवासात ही भक्ती निर्माण होऊ शकते, वाढू शकते, हेच ह्या सर्व गोष्टींचे मूळ कारण आहे.”
ह्यानंतरचा ब्रह्मराक्षसाचा १०वा प्रश्न हा आपल्या सर्वांच्या मनात नेहमीचे खदखदणारा प्रश्न आहे.
१०) परमेश्वर म्हणजे कोण आहे?  त्याची भक्ती म्हणजे काय?
       शहाणा कोणाला म्हणतात ?”
राजपुत्र उत्तर देतो,
ह्या विश्वाचा स्वामी परमेश्वर आहे .भक्ती म्हणजे परमेश्वराविषयी दृढ निष्ठा होय. शहाणा माणूस सर्वोच्च शांतीचे पालन करतो  आणि त्याच्या मनात सर्व जगाविषयी प्रेम असते आपल्या प्रेमाने तो जगात मिसळून जातो.”
------------------------------------------------------------------ 
ह्यानंतरचा ब्रह्मराक्षसाचा ११वा प्रश्न जगातील मनुष्य स्वभावाचे नमुने दाखविताना दिसतात,
११) सगळ्यात भित्रा माणूस कोण? आपत्तीग्रस्त कोण? दरिद्री कोण?”
राजपुत्र उत्तर देतो,
              मोठ्या कुटुंबाचा प्रमुख हा सदैव आपत्तीग्रस्त असतो.
               अधाशी इच्छा करणारा सर्वात दरिद्री असतो.”
ह्यातील पहिले उत्तर
अतिशय श्रीमंत माणसाला त्याचा पैसा भित्रा बनविते.
 धनवान माणूस हा भित्रा सांगितलेला आहे. आपण पहातो, श्रीमंत माणूस त्याच्याकडची संपत्ती तिजोऱ्यांमध्ये कडिकुलपात ठेवतो, सुरक्षा रक्षक नेमतो, इमानदार कुत्रा पाळतो, हल्लीच्या जमान्यात क्लोज सर्किट टी. व्ही. बसवितो अर्थात हे उपाय शेवटी सज्जन माणसाला चोरी करण्याचा मोह होवू नये म्हणून असतात. चोरी करणाऱ्यासाठी हे सर्व उपाय कुचकामी ठरतातविविध उपायांनी पैसा सुरक्षित ठेवला तरी त्या धनवान माणसाचे किंवा त्याच्या कुटुंबियांचे अपहरण करुनही गुन्हेगार तो पैसा लुबाडून नेतात. म्हणजे शेवटी श्रीमंत माणसाचे जीवन सदैव भितीच्याच छायेत जाते. शालेय इतिहासात आपण शिकतो, गझनीच्या महंमदाने पैसा पैसा करुन अमाप संपत्ती जमविली. ती सुरक्षित ठेवण्यातच त्याचे आयुष्य गेले, परंतु आयुष्याच्या अखेरीस मृत्युमुळे ही सर्व संपत्ती ह्या इहलोकात सोडून अल्लाकडे जायचे आहे, ह्या कल्पनेने तो ढसा ढसा रडला. म्हणजे तो शेवटी मृत्युला भ्यालेला आहे.
तात्पर्य आयुष्य जगायला पैसा लागतो परंतू पैशातून मिळणारे भित्रे आयुष्य काय कामाचे?
दुसरे उत्तर पाहूया,
मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखाला आपत्तिग्रस्त म्हटलेले आहे.
                                    मोठ्या कुटुंबातील लोक कौटुंबिक सुरक्षितेत मजेत जगत असतात. परंतू हे कुटुंब एकत्र बांधणे, त्यातील निरनिराळ्या स्वभावांच्या लोकांची मोट वळणे, तसेच कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणे म्हणजे कुटुंबप्रमुखाची रोजची तारेवरची कसरत असते. ह्यासाठी मला वाटते आपल्या भारताचे पंतप्रधान पद हे उत्कृष्ट उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे .
                                   आपले (माजी) पंतप्रधान माननीय मनमोहनसिंग हे जागतिक मान्यताप्राप्त अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या स्वागतास जगातील महाशक्तीचे अमेरिकेचे अध्यक्ष श्री.बराक ओबामा आपल्या ऑफिसबाहेर स्वतः येतात, ह्यात श्री मनमोहनसिंग ह्यांना जगाने दाखविलेला आदर दिसतो. परंतू भारतासारख्या विशाल देशाचा कुटुंबप्रमुख, ह्या नात्याने त्यांच्यावर येणारे रोजचे ताणतणाव पाहिल्यावर पंतप्रधानपद म्हणजे सोनेरी सिंहासन. ह्या सिंहासनात डोक्यावर सदैव टांगलेली टांगती तलवार  असते.
                            ही गोष्ट झाली आपल्या भारतासारख्या महाकाय देशाची व त्या देशाच्या पंतप्रधानाची देशातील लोक, त्यांचे स्वभाव, आपल्या हातात नसतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ति परंतु चार भिंतीच्या घरात रहाणाऱ्या कुटुंबाला, आपला कुटुंबप्रमुख आपत्तीग्रस्त होवू नये, एवढी काळजी निश्चित घेता येईल.
आता तिसरे उत्तर पाहुया
अधाशी इच्छा करणारा सर्वात दरिद्री असतो.
                           सोन्याच्या अधाशी इच्छेसाठी आपली भारतीयांचा सोन्याचा सोस जगात प्रसिद्ध आहे. भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे कितीही सोने बाहेरच्या देशातून विक्रीस पाठवा, भारत हा देश अक्षरशः
गिळंकृत करतो. एवढे प्रचंड सोने आपण भारतीय दिमाखात विकत घेतो, परंतू त्याच्यामुळे आपली महागाई कमी होत नाही. देशाची आर्थिक बाजू मजबूत होत नाही. भारतास स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली तरी आपण अजुनही विकसनशील देश आहोत. देशातील प्रचंड सोन्याचे भांडार आपल्याला विकसीत देश बनविताना दिसत नाही.
                                     हे उदाहरण झाले सोन्याच्या हव्यासाचे ह्याच्या जोडीला भ्रष्टाचाऱ्यांची अधाशी वृत्ती, आपल्याला खरोखरीच पोखरत आहे, दरिद्री बनवीत आहे.
क्रमशः




Saturday 17 May 2014

त्रिपुरा रहस्य : चैतन्य म्हणजे काय ? ( भाग २ )




  श्रीगुरुदेव उवाच  भाग २ :-
                           ब्रह्मराक्षसाने धाकट्या राजपुत्रास सांगितले,”खूप दिवसांनी त्याला अशी वादविवादात हरलेली शिकार मिळालेली आहे, त्यामुळे तो ब्रह्मराक्षस खूप भूकेजला झालेला होता. ह्या ब्रह्मराक्षसाने पूर्वी एका देवव्रतनावाच्या वशिष्ठ ऋषींच्या शिष्यास  जंगलातून जाताना  शिकार म्हणून पकडले होते. तेव्हा ह्या देवव्रताने ब्रह्मराक्षसास शाप दिला की, कोणत्याही मानवाची शिकार तू खायला लागलास तर तुझे तोंड जळून जाईल. ब्रह्मराक्षसाने देवव्रताचे पाय धरुन क्षमा मागितली.  तेव्हा देवव्रताने ह्या ब्रह्मराक्षसास उःशाप दिला की, ‘तू फक्त वादविवादात हरलेल्या मनुष्यास खाऊ शकतोस.”
                                त्यामुळे तो ब्रह्मराक्षस म्हणाला, “मला खूप भूक लागली आहे. पहिले मला माझी शिकार खाऊ दे, नंतर मी तुझ्याशी वाद विवाद घालतो.”
                                   धाकट्या भावाने परत एकदा ब्रह्मराक्षसास विनंति केली की, “मी तुला दुसरे अन्न आणून देतो. तू माझ्या भावाला सोड.” ब्रह्मराक्षसाने राजपुत्रास सांगितले, “दिलेले वचन हे पाळावेच लागते, त्याची अशी किंमत करता येत नाहीपरंतू मी तुला शब्द देतो की तू  माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलीस तर मी तुझ्या भावाला जिवंत सोडीन.”
                                 ब्रह्मराक्षसाची ही अट धाकट्या राजपुत्राने मान्य केलीब्रह्मराक्षसाने त्याच्या मनातले प्रश्न राजपुत्रास विचारायला सुरवात केली.
ब्रह्मराक्षसाने पहिला प्रश्न विचारला,
१) अवकाशापेक्षा विस्तृत व सूक्ष्माहूनही सूक्ष्म अशी गोष्ट कोणती? तिचा गुणधर्म कोणता? व ती कोठे असते?”
राजपुत्राने उत्तर दिले, “चैतन्य ही अवकाशाहूनही विस्तृत आहे व ती जगातील सूक्ष्मतम गोष्ट आहे.
स्फुरणे  हाच तिचा गुणधर्म आहे.
   आत्मा हेच तिचे ठिकाण आहे. “
                                 इथे आपल्या एक गोष्ट लक्षात येते, श्रीगुरुदेवांच्या काळातआकाशाच्या बाहेर असलेल्या पोकळी म्हणजे अवकाश लोकांना माहित असलेले दिसते. कारण आपल्याला पृथ्वीचे बाह्य आवरण फक्त आकाशच दिसते परंतू त्या आकाशाच्याही बाहेर पसरलेल्या अवकाशाचे उदाहरण चैतन्याची व्याप्ती सांगताना दिलेले दिसते
                                                   क्रमशः    

Thursday 15 May 2014

त्रिपुरा रहस्य : चैतन्य म्हणजे काय ?

भाग १



श्रीगुरुदेवांनी आपला शिष्य भगवान परशुराम ह्यास एक काल्पनिक गोष्ट सांगितली ह्या गोष्टीतील पात्रांच्या संवादातून त्यांनी जीवनात अनुभवयास येणारे परंतू अनाकलनीय असे सत्य सांगितलेले दिसते .
                               लहानापासून मोठ्यापर्यंत गोष्टी सर्वांनाच आवडतात. गोष्टीरुपात आपण कल्पनेतील दुनियेत फेरफटका मारू शकतो व अशा ह्या शिक्षणाचे विद्यार्थ्याला ओझे होत नाही, ह्यातून श्रीगुरुदेवांची अवघड विषय अत्यंत सोपा करुन सांगण्याची हातोटी दिसते.  
                               ही गोष्ट म्हणजे लहानपणापासून आपल्याला आवडणाऱ्या विक्रम वेताळ गोष्टीसारखी आहे. ह्या कथेत ब्रह्मराक्षस व दोन राजपुत्र भाऊ ही काल्पनिक पात्र आहेत. ब्रह्मराक्षस व मोठा राजपुत्र हे दोघे शास्त्री म्हणजे आजच्या भाषेत चार बुक शिकलेले दाखविले आहेत तर लहान राजपुत्र हा श्रेष्ठ दर्जाचा ज्ञानी. गोष्टीरुप पद्धतीत शिष्याच्या मनात येणाऱ्या शंका ब्रह्मराक्षस धाकट्या राजपुत्रास विचारताना दिसतो.
                              श्रीगुरुदेवांच्या गोष्टीतील राजपुत्र हे विपासा नदीच्या काठावरील अमृता नगरीच्या रत्नगड राजाचे सुपुत्र आहेत.  ह्यातील मोठ्या राजपुत्राचे नाव रुकंगड असून तो शास्त्री पंडीत आहे. धाकटा राजपुत्र हेमंगड हा श्रेष्ठ दर्जाचा विद्वानआहेहे राज घराण क्षत्रिय असल्याने शिकार करता येणे, हे त्यांचे आयुष्यातील महत्वाचे शिक्षण. हे दोघे भाऊ एकदा घनदाट जंगलात वाघ, सिंह, हरीण अशा प्राण्यांची शिकार करण्यासाठी, आपले नियमित काम करण्यासाठी जातात. त्यादिवशी खूप प्रयत्न करुन त्या भावांना शिकार मिळ नाही. दमून भागून दोघे भाऊ विश्रांतीसाठी जंगलातील एका झऱ्याकाठी बसलेले  असताना जंगलातील लोक जवळच रहाणाऱ्या ब्रह्मराक्षसाची बातमी ह्या दोघा राजपुत्रास देतात. हे जंगलवासी सांगतात, “हा ब्रह्मराक्षस खूप हुशार आहे. तो प्रथम माणसास वादविवादात हरवितो व अशा हरलेल्या माणसास नंतर तो ब्रह्मराक्षस खातो.”
                        रुकंगड हा राजपुत्र स्वतः शास्त्र शिकलेला होता व त्याला हे असे शास्त्रविषयक वाद विवाद करायला आवडत होते. ब्रह्मराक्षसाची बातमी कळल्यावर तो स्वाभाविकच आपल्या भावाला घेऊन ब्रह्मराक्षसाकडे शास्त्र विषयक वाद विवाद करण्यास गेला.

                             परंतू ब्रह्मराक्षसाने वादविवादात त्याला हरविले. ह्या पराभूत राजपुत्रास ब्रह्मराक्षसाने त्याच्या नियमानुसार खाण्यासाठी म्हणून पकडले. हे सर्व पाहिल्यावर धाकटा भाऊ हेमंगडाने ब्रह्मराक्षसाला विनंती केली की,तू माझ्या मोठ्या भावाला खाऊ नकोस. प्रथम मला शास्त्र विषयक वाद विवादात हरव. नंतर आम्हा दोन्ही भावांना तू खा.”
 क्रमशः

Saturday 10 May 2014

त्रिपुरा रहस्य : ज्ञानी व्यक्तीतील लक्षणे

                                         
 


श्रीदत्तगुरुंनी आपला शिष्य भगवान परशुराम, यास ज्ञानी व्यक्तीत आढळणारी लक्षणे सांगितली :-
) वैराग्य वृत्ती : श्रीगुरुदेवांच्या मते वैराग्यवृत्ती शिकता येत नाही. ती मुळात असावी लागते.
) खरा ज्ञानी माणूस आपल्याला मिळालेले ज्ञान दुसऱ्याला समजावून सांगतो.
आपण खूपदा पहातो, लोक हुशार असतात परंतू ती हुशारी किंवा तो विषय ते दुसऱ्याला सांगू शकत नाहीत.
                  श्रीदत्तगुरु सांगतात, सच्चा भक्ताकडे ईश्वरदत्त वैराग्यवृत्ती असल्याने, तो ह्या मनोदेवेतेमागचे शास्त्र समजू शकतो व इतरांना समजावून सांगू शकतो.”
श्रीदत्तगुरु सांगत असलेली वैराग्यवृत्ती क्वचितच आढळते. नेहमी आपण पहात असतो, ज्ञानी माणूस हा त्याच्या ज्ञानावर स्वतःचा हक्क असल्याच्या अविर्भावात असतो.
 वैराग्यवृत्तीची ज्ञानी व्यक्ती :  महिला शास्त्रज्ञ मादाम मारी क्युरी.
त्यांनी रेडीयमह्या किरणोत्सर्गी मूलद्रव्याचा शोध लावल्यावर लोकांनी त्यांना विचारले,”तुम्ही याचे पेटंट का घेत नाही?” त्यांचे उत्तर त्यांची वैराग्य वृत्ती दर्शविते. त्यांनी सांगितले, “निसर्गाने कुठे पेटंट घेतले आहे?    त्या निसर्गातील एका घटकाचे पेटंट मी कसे घेऊ?”  ह्या किरणोत्सर्गी शोधामुळे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर Radiation चे उपचार मिळून वैद्यकीय क्षेत्रावर अनंत उपकार झालेले आहेत.
                     ह्याच वैद्यकीय जगतातील काही परदेशी ज्ञानी लोकांनी पिढ्यांपिढ्या चालत असलेल्या आजीच्या बटव्यातील निर्जंतूक हळदीचे पेटंट घेतले.
                   हल्लीच्या पिढीला आजीचा बटवा म्हणजे काय असतो? हे माहिती नाही .पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत असल्याने घरोघरी आजी आजोबा, आई वडील, आत्त्याकाका काकू, मुलेबाळे मिळून जवळ जवळ १० ते १५ लोक एकत्र रहात असत. हल्लीसारखे उठसूठ डॉक्टरकडे न जाता आजीच्या बटव्यातील घरगुती औषधे देत असत. या बटव्यात जायफळ, मायफळ, वेखंड, हळद, सूंठ, दालचिनी, रगत रोडा, लवंग वगैरे औषधी वस्तू असत. ह्या नैसर्गिक वस्तू औषध म्हणून वापरल्याने आजार बरे होत असत. तसेच शरीरावर साइड इफेक्ट होण्याची धास्ती रहात नसे.
                     श्री. रघुनाथ माशेलकर हे खरे  ज्ञानी असल्याने  जगाला हळदीवर पेटंट घेणे कसे गैर आहे, हे पुराव्यानिशी सांगू शकले. यंदाचे पद्मविभूषण त्यांना देऊन आपल्या सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला.
                    दि. १३ फेब्रुवारी २०१४ रोजी यंदाचामोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर झालेला आहे. १ लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह हे या पुरस्काराचे स्वरुप असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या लौकिक कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. डॉ. माशेलकर हे वनराईच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत.
                       आयुष्यातील कमीत कमी १२ वर्षे अनवाणी पायांनी चालणाऱ्या, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करुन ज्ञानवंत झालेल्या डॉ. माशेलकरांना न्युटनने स्वाक्षरी केलेल्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान इंग्लंडमध्ये शास्त्रीय जगाने दिला आहे
                  अशा ह्या श्रेष्ट ज्ञानवंतास - डॉ. रघुनाथ माशेलकर यांना श्रीगुरुचरित्र आशय - निधीप्रकल्पातर्फे शुभेच्छा.
)ज्ञानी माणूस आधी स्वतःच्या मनोदेवतेचे शास्त्र ओळखतो. नंतर तो ते शास्त्र दुसऱ्याला समजावून सांगायला लागतो व तिथे त्याला तो सांगत असलेल्या गोष्टीतील सत्य समजते.
आपण विद्यार्थी दशेत शिकतो परंतू एखादा विद्यार्थी त्याचे शिक्षण संपल्यावर जेव्हा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांपुढे उभा रहातो तेव्हा तो दुसऱ्यांदा शिकतो. शिकत असताना त्याने शिकलेल्या गोष्टी दुसऱ्याला  समजावून सांगताना त्याला त्या गोष्टींच्या मूळ गाभ्यापर्यंत जावे लागतेअसाच शिक्षक विद्यार्थी प्रिय होतो .कारण मुळातला गाभा (ज्याला श्रीदत्तगुरु गोष्टी मागचे सत्य )समजला नाही  तर दुसऱ्याला त्या गोष्टी कशा शिकविणार?
                       ) श्रीगुरुदेव ज्ञानी माणूस हा शेवटी जीवनमुक्त कसा होतो ? ते सांगतात.
                          ज्ञानी माणुस इतर  व्यक्तीमधील शिव म्हणजे पवित्र्य ओळखायला लागतो. त्याच्यावर आनंद व दुःख यांचा परिणाम न झाल्याने तो खरोखरच जीवनमुक्त होतो. ही सर्व मनाची ज्ञानातून येणारी अत्युच्य स्थिती भक्तीमार्गातून येते, म्हणून श्रीदत्तगुरु भक्तिमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.
               श्रीगुरुदेव सांगतात ज्ञान मिळविण्यासाठी परमेश्वरी कृपेची नितांत गरज असते.
खुपदा आपण पहातो विद्येमुळे मिळणाऱ्या यशाला नशीबाच्या साथीची गरज असते.
                      श्रीगुरुचरित्रात श्रीगुरुचरित्रकारांची समाजाला भक्तीमार्गाकडे वळविण्याची तळमळ दिसून येते.
 (संदर्भ ग्रंथ :
                    The Mystery Beyond the Trinity
                    Tiprura Rahasya
                    Translated by

                   SWAMI SRI RAMANANANDA SARASWATHI )

Thursday 1 May 2014

‘ प्रगतीची पाऊले चालावीत अध्यात्माची वाट ’


                     श्री. अण्णा हजारे यांनी उभारलेल्या भ्रष्टाचार निर्मूलक आंदोलनातून यंदाच्या २०१४ सालच्या लोकसभा निवडणूकांकडे समस्त जग आशेने पहात आहे.
                 ऑफीसचे काम संपवून कोल्हापूरमार्गे नासिकला परत येत असताना, मागच्या आठवड्यात कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर आमची गाडी पुणे मार्गे नासिकला परत न येता राळे गण सिद्धिला वळाली. अचानक आलेल्या उर्मीतून प्लॅन केल्याने  श्री. अण्णांची अपॉइंटमेंट घेतली नव्हती, ते भेटतात की नाही? ही धाकधुक मनात होती. तिथे पोहोचल्यावर कळाले की, दुपारी १२ पर्यंत भेटण्याची वेळ असून लोकांची रीघ दुपारी २:३० वाजेपर्यंत होती. त्यामुळे आता जेवण झाल्यावर श्री. अण्णा भेटतीलच हे सांगता येत नाही. पुढची भेटण्याची वेळ संध्याकाळी ५:३० ला सुरु होते. रात्रीच्या आत नासिकला परतायचे असल्याने संध्याकाळी ५:३० पर्यंत थांबणे अशक्य होते.
                  परंतु जेवण झाल्यावर आम्हाला तसेच सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाण्याहून आमच्यासारख्याच अचानक आलेल्या लोकांना श्री अण्णा हजारे हसतमुख भेटले.
                   इतके दिवस फक्त भ्रष्टाचार निर्मूलक म्हणून मनःचक्षूसमोर असलेली श्री. अण्णांची प्रतिमा साक्षात ज्ञानेश्वरी जगणारा माणुस ह्या रुपात भेटली.
                   त्यांच्या कार्यालयाचा परिसर हा एक स्वच्छ आधुनिक आश्रम आहे. कार्यालयातील लोक तसेच गांवकऱ्यांमध्ये सहकार्याची भावना दिसली.दुष्काळी प्रदेशातील ह्या गावात झाडाला आंबे खूप लगडलेले आहेत. वडाच्या वृक्षाचे उच्चाटन न करता त्याला पूर्ण वाढू देऊन फक्त त्रासदायक पारंब्या कापलेल्या दिसतात. कुलरपाशी पक्षी माणसांना न घाबरता पाणी पिताना दिसतात. हिमाचलप्रदेशातील काही लोक पाणी संवर्धनाचा कोर्स करण्यासाठी ह्या आश्रमात आलेले आहेत. २००४ साल पर्यंत १४ हजारहून जास्त लोक येथून जल संवर्धन शिकून गेलेले आहेत.
                       पाण्याचा दुष्काळ असलेल्या ह्या गावात
श्री. अण्णांनी प्रत्येक गावकऱ्यातला कामगार जागा केला. गावाजवळच्या डोंगरमाथ्यावर गावकऱ्यांच्या श्रमदानातून मातीचे चौकोनी तळे निर्माण केले. ह्या डोंगरास उतारवर समपातळीची तळी चारही बाजूंनी निरनिराळ्या टप्प्यात तयार केली. सर्वात  खालच्या तळ्याच्या टप्प्यातील पाणी गावातील शेताच्याकडेनी फिरविलेले दिसले. ह्या पाण्याच्या ओढ्यात ठिकठिकाणी बंधारे लोकांच्या श्रमदानातून बांधलेले दिसतात. आज एप्रिल- मे महिन्यातील भर उन्हाळ्यात गावातील विहीरी पाण्यानी भरलेल्या आहेत. गावातील शेती श्रमदानाच्या सहकार्यातून होते.
                            गावातील प्राथमिक सरकारी जिल्हा परिषद शाळा गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधली आहे. ह्याच शाळेसमोर ५वी ते १२वी अशी गावाने खाजगी शाळा वसतिगृहासहित  उभारली आहे. ह्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे नापासांना प्राधान्य. श्री अण्णा हजारेंना मिळणारा विविध पुरस्कार निधी ह्या शाळेवर खर्च होतो. गावाचा केलेला कायापालट छायाचित्र व मॉडेल रुपात आपल्या दिसतो. हे पुरस्कार ठेवण्यासाठी बांधकाम सुरु असलेली सिमेंटची इमारत (संग्रहालयाची वास्तू) बांबूची वाटते.येथील सिमेंटच्या कुंड्याही वृक्षाची खोड वाटतात. झाडाची मुळे जादा पाण्याने सडू नयेत म्हणुन ह्या अतिरिक्त पाण्यास प्रत्येक कुंडी वाट ठेवलेली दिसते. शाळेतील १०वी पास मुले सुट्टीचा सदुपयोग -शाळेत चिमण्यांची घरे बनविताना दिसली.
                       अशा ह्या आदर्श गावातील पुष्कळ तरुण सैन्यात भरती झालेले आहेत. जागतिक बॅन्केने राळे गण सिद्धी ह्या गावाला गौरविलेले आहे.
                   श्री. अण्णा हजारेंच्या मते अध्यात्म हेच जीवनातील   मार्गदर्शक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त त्यांच्यात दिसला.
ह्या अनोख्या आदर्श गावामागची प्रेरणा श्री. अण्णा हजारे कडून समजली :-
ज्ञानेश्वरी अध्याय १४ ओवी क्रमांक २३३
नगरेचि रचावी। जलाशये निर्मावी।
महावने लावावी। नानाविधे॥ १४ -२३३॥
ह्याच पद्धतीने आपणही आपली गावे सुधारली तर,
भारत = भाः( दिव्य प्रकाश) + रत (रमलेला देशहे  हेनाव सार्थ करेल.
त्यासाठी प्रत्येक भारतीयाने भ्रष्टाचार निर्मूलक कामगार होणेगरजेचे आहे.

'१ मे २०१४ कामगार दिनाच्या शुभेच्छा'