( आज -स्वतंत्र भारत )
धाव धाव गा, भारतीय जनता (गा = अहो)
करील बा साह्य,
भारत-माता॥ धृ॥
आग लागली ह्या देशाला
स्वस्थ कसे हो तुम्ही बसला
चला जलदी विझवायला
अवधी नसे ह्या कार्याला॥ १॥
धाव धाव गा,----- ॥ धृ॥
देशसेवेला बहुत लागले
राजकारणी जाऊन पडले
कठीण समयी ते नच अडले
भ्रष्ट
नीतीने तयांना सोडविले॥ २॥
धाव
धाव गा,----- ॥ धृ॥
आज पेरिले बीज अर्थक्रातींचे
नमो दावती ब्रीद प्रगतीचे
पाश तोडूनी कृष्ण पैश्याचे
व्यवहार व्हावे धवल धनाचे॥
३॥
धाव धाव गा,----- ॥ धृ॥
भुलू नका त्या गारुडाला
परदेशीच्या भूलभूल्लयाला
जुलुमी अशा चिनी सत्तेला
सत्य जाणूनी घेरा तयाला॥४॥
धाव धाव गा,----- ॥ धृ॥
करावी मुक्त ही क्षिती
संपवूनि दहशतवादी नीती
एकनिष्ठ पुत्र भारताचे
भोगिती फल महासत्तेचे ॥ ५॥
धाव धाव गा,----- ॥ धृ॥
अनुप्रभा, नाशिक
www.shrigurucharitra.com
------------------------------------------------------------------
*
संदर्भ
:-
सुमारे ७५ वर्षांपूर्वी
(पारतंत्र्यातील भारत)
देशाचे गाणे
(चाल - तारी प्रभो महाराष्ट्राला)
धाव धाव त्वरे धाव ईशा ।
करी बा साह्य ह्या क्षणी देशा॥धृ॥
आग लागली देशाला।
स्वस्थ कसे हो तुम्ही बसला।
चला जलदी विझवायाला।
अवधी नसे ह्या कार्याला॥ १॥
धाव धाव त्वरे --- ॥धृ॥
देशसेवेला बहूत लागले।
कारागृही जाऊन पडले।
कठीण समयी ते नच खचले।
लाठ्यांचे ते हल्ले सोशीयले॥२॥
धाव
धाव त्वरे --- ॥धृ॥
आधी लोकमान्य टिळकांचे।
ब्रीद दावा स्वातंत्र्याचे।
पाश तोडा भूमातेचे।
नाम जपा गांधीजींचे॥ ३॥
धाव धाव त्वरे --- ॥धृ॥
भुलू नका गारुड्याला।
परदेशाच्या मोहाला।
जुलमी अशा इंग्रजाला।
सत्य लढूनी घेरा त्याला॥४॥
धाव धाव त्वरे --- ॥धृ॥
करी मुक्त गांधीजींना।
प्रभू यश देई त्यांना।
एकनिष्ठ सत्यतेचे।
फल देई स्वातंत्र्याचे॥ ५॥
धाव धाव
त्वरे --- ॥धृ॥
कै. राधाबाई आठवले, नाशिक