Saturday 9 September 2017

लोक (तडजोड ?) न्यायालय

                          आज दि. ९ सप्टेंबर २०१७ रोजी आम्हा माय-लेकींना लोक न्यायालयात एका प्रथितयश सेल्युलर कंपनीने आमंत्रण दिले. हे आमंत्रण लेखी नोटिसद्वारे का आले नाही? हे गुढ आम्हाला उलगडले नाही, परंतु मोबाईल फोनवर आलेल्या smsमुळे आमची स्वारी सर्व कागदपत्र-पुराव्यांसहित लोक न्यायालयात  दाखल झाली.
                              डिसेंबर २०११ मध्ये सदर कंपनीचे प्रतिनिधींनी  आमच्या एम. आय. डी. सी. ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या नेट सेटरची माहिती दिली. त्याकाळी असलेल्या डायल अप नेट कनेक्शनने जेरीस आलेल्या आम्हाला हा नेट सेटरएक वरदान वाटला. वार्षिक वर्गणी (नेट सेटर सहित) रुपये ३०१०/= रोख व कागदपत्रांची पुर्तता करुन (दिनांक २० डिसेंबर २०११ रोजी पावती क्रमांक १०७) आम्ही नेट सेटर बुक केला. जानेवारी २०१२ पासून नेट सेटर कार्यन्वित झाला.
                                    दि. १४ जानेवारी २०१३ रोजी, सदर कंपनीच्या जानेवारीत आमच्या ऑफीसमध्ये आलेल्या प्रतिनिधीला मागील वर्षी प्रमाणे रुपये ३०१०/= रोख अॅडव्हान्स देऊन (पावती क्रमांक २९७३- नेट सेटर २०१३साठी) आम्ही निश्चिंत झालो.

                                      जुलै २०१३मध्ये कंपनीने वकिलाची नोटिस पाठवून थकबाकी रुपये ११६६/९६ ची मागणी केली. ह्या वकिलांना तसेच सदर कंपनीच्या पुणे ऑफिसला कुरीअरने पत्र पाठवून अॅडव्हान्स रुपये ३०१०/= च्या पावतीची झेरॉक्स पाठवली. ह्याचा परिणाम कंपनीने आमच्या नेट सेटरची सेवा बंद करुन, तुमची केस पुण्याच्या कोर्टात दाखल झाली आहे, वगैरे धमक्या देण्यास सुरवात केली. नासिकच्या नेट सेटरसाठी पुणे कोर्टाची गरज काय? त्याचे उत्तर कोर्टाचे समन्स आल्यावर कळेल, वगैरे दमदाटीवजा फोन.
                                   एका अर्थी कंपनीला अॅडव्हान्स पैसे देऊन आपण पाप केल्याची जाणीव मनाला त्रस्त करीत होती. ह्याच काळात दि. ५ ऑगस्ट २०१३ रोजी लोकसत्ता वर्तमानपत्रात चुकीचे शुल्क आकारणाऱ्या मोबाईल नेटवर्क कंपनीला सहा हजारांचा दंडही बातमी वाचनात आली.
                                    ‘कोर्ट कचेऱ्या करण्यापेक्षा उरलेल्या ६ महिन्यांच्या पैशावर पाणी सोडून द्यावे’  ह्या सुज्ञ विचाराने जग-रहाटी चालत असताना, अचानक १५ दिवसांपूर्वी मोबाईलवर ९ सप्टेंबर २०१७ च्या लोक-न्यायालयाचे आमंत्रण sms ने आले.
                                       नेट सेटरचे टोंगल तसेच दोन्ही वर्षांच्या ओरिजनल पावत्या पुरावा म्हणुन सादर केल्या,तरीही आम्हाला तडजोड करुन प्रकरण मिटवावे लागले. वास्तविक आमची ६ महिन्यांची अॅडव्हान्स रक्कम कंपनीकडे जमा असताना, झटपट तडजोड ह्या न्यायाने कंपनीशी बारगेनिंग करीत रुपये १६१४/१६च्या ऐवजी रुपये ७००/= त प्रकरण मिटले.
                         ‘लोक न्यायालयात न्याय मिळेलह्या अपेक्षेने आलेल्या आम्हाला तडजोडीचा अन्याय सहन करावा लागला.
प्रभा आठवले, नाशिक
सेवानिवृत्त हायस्कूल शिक्षिका

Tuesday 5 September 2017

अनंत चतुर्दशी : व्रत अनंताचे

                गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
म्हणत श्रीगणेशाला वार्षिक निरोप देणारा दिवस - अनंतचतुर्दशी.
                          भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंताचे म्हणजे श्रीविष्णुचे व्रतकरावे, असे श्रीगुरुंनी सायंदेवाला सांगितले (श्रीगुरुचरित्र अध्याय ४१) आहे. श्रीगुरुचरित्रकारांनी हे व्रत कसे करावे? ह्याची माहिती महाभारतातील कथेद्वारे अध्याय ४२मध्ये दिलेली आहे.
अनंत  व्रत  कसे  करावे ?
                                   तांबड्या  रेशमी  दोऱ्याच्या  १४  गांठीचा  अनंत  करावातो  घेऊन  नदीवर  यावेशूचिर्भूत  स्ना  करावेचांगले  वस्त्र  नेसूनहळद  कुंकू  लावूनदोन  नवीन  कलश  आणावेतोंडाने  ‘गंगा - यमुनाम्हणत ह्या कलशांत  पाणी  रावेपंचपल्लव-पाच प्रकारच्या वृक्षांची पाने  (पिंपळ,वड,आंबा इत्यादी)   त्नासहित  कलशांत  घालून  षोडशोपचार  करून  त्याचे  त्वरित  पूजन  करावेगंगा-यमुनेची  नानाप्रकारची  आरती  करूनर्भाचा  शेष  करून  पूजा  करावीदोन  कलशावर  नवीन वस्त्र  ठेवावेत्या  कलशापुढे  शंख - पद्म  पंचरंगी  पुडीनी  भरलेल्या  रांगोळ्या  काढाव्यात. र्भाचे  शेष  पुजावेशेषाची  षोडशोपचारे  पूजा  करावी.  ‘शेषशाई’  म्हणून  विष्णुचे  ध्या  करावेसातफणीच्या  शेषाबरोबर  नेहमी  विष्णु  असतोयाच  कारणास्तव  त्याचे  नाव  ‘अनंतअसे  म्हणून  ध्यान  करावे
                           पिंगट  रंगाचे  डोळेचार  बाहूउजव्या  हातात  शंख- पद्मडाव्या  हातात  चक्र    गदा  अशा  विष्णुमुर्तीचे  ध्या  करावे.  ‘  नमो  भगवते’  या मंत्राचा  उच्चार  करूनर्भग्रंथीची  षोडशोपचारे  पूजा  करावी.
                        नवीन  दोन  नवे  दोरे  आणून  ‘पुरुषसुक्त’  म्हणून  पूजा  करावी.  ‘अतोदेवा’  मंत्र  म्हणावाषोडशोपचारे  पूजा  करावीउजव्या हातात  ‘संसारगव्हरेती’  मंत्र  म्हणून  धागा  बांधावा.   ‘नमस्ते  वासूदेव’  मंत्र  म्हणून हातातील  जीर्ण  गत वर्षीच्या दोऱ्याचे  विसर्जन  करावे.  ‘दाताच  विष्णुर्भगवान’  म्हणत   एक  शेर गव्हात  गूळ  वगैरे  मिसळून फळांसहित वाण द्यावे.  तसेच ब्राह्मणाला तांबूल दक्षिणेबरोबर गव्हाची खीर द्यावी. उरलेल्या अर्ध्या खीरीचे स्वतः (व्रत करणाऱ्या व्यक्तीने ) भोजन करावे. असे हे व्रत चौदा वर्षे करावे. चौदा वर्षे अनंताचे व्रत पूर्ण केल्यावर, ह्या व्रताचे उद्यापन करताना चौदा कलश दान देऊन ब्राह्मण भोजन करावे. क्तीभावाने उद्यापन केल्यावर, मनातील इच्छा पूर्ण होऊन चतुर्विपुरुषार्थाचा ला होतो.
                                  कृतयुगात कौंडिण्य ऋषींची पत्नी सुशीलाहिने आचरलेले अनंत व्रतभगवान श्रीकृष्ण पांडवांना आचरण्यास सांगतात. “अशा प्रख्यात अनंत व्रताचा धागा तू सतत बां, तसेच ह्या व्रताची  दीक्षा तुझ्या ज्येष्ठ मुलाला  (नागनाथाला) दे”, असे श्रीगुरु सायंदेवाला सांगतात.
प्रभा आठवले, नाशिक
संकलक : श्रीगुरुचरित्र आशय-निधी
www.shrigurucharitra.com