Wednesday 26 February 2014

 महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
दि. २७ फेब्रुवारी २०१४
दुष्टांचा संहारक, अनाथांचा तारक, यावे शिव शंकरा

भारतीय नाद विश्वात नित्य घुमो सत्यं, शिवम् ,सुंदरा
शिवालय निर्मिती : टाकाऊ वस्तूंपासून टिकावू शिवालय
पॅकिंगमध्ये आलेले थर्मोकोल, वाण्याचे सामानाला बांधलेल्या दोऱ्याच्या बाहुल्या, संपलेल्या सॅनिफ्रेश बाटलीचे बूच घंटा, संपलेली आगपेटीची दानपेटी, स्पंज तुकड्यांचे शिवलिंग व नंदी थर्मोकोलच्या गोळ्यांची फुले, टाकावू तारेतून पिंडीवर इत्यादी

Tuesday 25 February 2014

अखंड भारत - स्वप्न

             अखंड भारत - स्वप्न
गतवीरांची स्म्रृती जागृतीस्तव, शिव प्रतिष्ठानाने घातला घाट
नतमस्तके प्रणाम करण्या, पाऊले चालती अंदमानची वाट
पारतंत्र्य बेडी झुगारण्यास्तव स्फुरली विनायकाची छाती
स्वातंत्र्यास्तव प्राणार्पण करण्या नाही कशाची भिती
अस्पृशता निवारण, जातीभेद निवारण्यार्थ हाती घेतली लेखणी
अखंड भारत स्वप्न साकारण्यास्तव प्रज्वलित तव वाणी
कोलू पिसता पिसता, श्रमाची नाही केली तमा
तत्व रक्षण्या मनी कधी अपेक्षिली नाही क्षमा
खळ खळ बेड्या वाजत होत्या लोखंडी पायी
परसत्तेची अमानुषता प्रकटत होइ ढायी ढायी
राजद्रोहाची शिक्षा म्हणून अंदमान काळे पाणी
त्या शिक्षेतून स्फूरली देशभक्तीची सुरेल गाणी
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मनी रंगविले स्वप्न तू भव्य
स्वतंत्र अखंड भारताचे चित्र रेखाटले तू दिव्य
तरूणांनो लष्करात भरती व्हा ही तुझी साद
स्वातंत्र्य रक्षण्या क्षात्र तेजाची उमटवा प्रतिसाद
स्वातंत्र टिकवण्या देशाच्या सर्व सीमा असाव्या संरक्षित
लक्ष्यद्विप बेटे, स्वर्गाचे द्वार सन्मानित व्हावे आरक्षित
चिनी सत्तेने आजी प्रवेशास्तव केले सागरी लक्ष्य
भूतकाळी स्वातंत्र्यवीराची वाणी वदली करू नका भक्ष्य
अंदमानी प्रवेश करता जागृत झाल्या वीरांच्या स्मृती
अचाट संयम, अफाट धैर्य देखता गुंग झाली मम मती
                                    प्रभा आठवले, नासिक

jayostute.com वर २०१२ साली प्रकाशित

Saturday 22 February 2014

पूर्वजांनी दिलेला सगुण विविध मूर्तिंचा अमूल्य ठेवा (भाग २ )


सगुण मूर्ति : संकल्पना (भाग २ )
 श्रीगणेश प्रार्थना :                                                           ॥श्रीगणेशाय नमः
चिंता नुरे हरतसे मनु देह ताप।
विद्येमुळे मिळतसे यश अमाप॥
भजा हो तुम्हीविद्यारदेवदेवा।
याचीतसें तव पदीं दृढ ज्ञान ठेवा॥
या प्रार्थनेतील,
चिंता नुरे हरतसे मनु देह ताप।
चिंता नुरे म्हणजे चिंता न उरे, हरतसे म्हणजे नाश होणे, मनु म्हणजे माणसाचे देह- ताप problems.
ह्याचा अर्थ चिंता उरली नाही तर माणसाच्या शरीराचे त्रास संपतील.
आपल्याला माहित आहे की चिंता मनाबरोबर शरीराला पोखरते. मधुमेह, रक्तदाब अगदी साधे सर्दी, पडसे इत्यादी पाहुणे त्या शरीरात प्रवेश करतात. शरीराच्या घरात मन रहात असल्याने ते एकमेकांना बांधलेले असतात. मनाची चिंता शरीर बिघडविते तर शारीरिक व्याधी मन पोखरते. अशा वेळेला डॉक्टर बरोबर देवाकडेही धाव घेतो.
श्रीगणपतिला चिंतामणि म्हणजे चिंता दूर करणारा  म्हणतात.
 मुद् गल पुराणातचिंतामणिह्या श्रीगणेशाच्या नावाची व्याख्या दिलेली आहे.
चिंतामणि ह्या शब्दाची व्याख्या सांगताना, मनाच्या ५ बिघडलेल्या अवस्था सांगितलेल्या आहेत : -
) बर्हिमुख व्यक्ती - बाहेरच्या जगाचा विचार करणारी व्यक्ती
) जास्त बर्हिमुख व्यक्ती  - बाहेरच्या जगाचाच विचार करताना पापाच्या मार्गाकडे जाऊ
    शकते.
) अंतर्मुख व्यक्ती  हिला   विक्षिप्त म्हटले आहे.
) जास्त अंतर्मुख व्यक्ती हिला  एकाग्र म्हटलेले आहे.
) निष्क्रीय मन ह्याला निरुद्ध म्हटलेले आहे.
मनाच्या ह्या पाचही स्थिती ज्ञानाच्या सहाय्याने नष्ट करतो व  मनाला शांती देतो तो चिंतामणि.
                     आपल्याला रोजच्या जीवनात माझा पहिला नंबर येऊ दे, बॉस चांगला वागू दे अशा तात्कालिक चिंता असतात व त्यांचे उत्तरही आपल्या रोजच्या वागणुकीत, कामात दडलेले असते. ते उत्तर मिळवायचा प्रयत्न न करता आपण नाहक चिंताग्रस्त होतो  व देवाकडे धाव घेतो.
               ह्या ठिकाणी आपल्याला मानसिक आधार निश्चित मिळत असेलही परंतु सर्वप्रथम संतुलित मन रहाण्यासाठी मनाला अंतर्मुख किंवा बहिर्मुख होण्यापासून थांबवायला पाहिजे.
              मनाला ज्ञानाच्या सहाय्याने संतुलित ठेवता येते.  ‘ज्ञानह्या शब्दाचा अर्थ जाणीव, विषयाचे आकलन, माहिती, ब्रह्मज्ञान असा आहे.
 श्रीगणेशाला १४ विद्यांचा स्वामी म्हणतात.  
१४ विद्या = ४ वेद  +  ६ वेदांगे –(शिक्षा ,कल्पज्योतिष , निरुक्त ,छंद आणि व्याकरण )
                 + ४ उपांगे – (पुराणे , मीमांसा ,न्यायशास्त्र व धर्मशास्त्र)    
चिंतामणि आपल्याला संदेश देतो : -
विद्याभ्यासातून मिळणाऱ्या ज्ञानाच्या सहाय्याने मन संतुलित राखता येते. मनःशांती  ही संतुलित मनाने प्राप्त होते.
दि. २२ फेब्रुवारी २०१४                                                                           क्रमशः
(संदर्भ ग्रंथ : What is the implied meaning of the many Names of Lord Ganapati?
                   By Hindu Janjagruti Samiti)



Friday 14 February 2014

पूर्वजांनी दिलेला सगुण विविध मूर्तिंचा अमूल्य ठेवा

सगुण मूर्ति : रुप (भाग १)                                                              
॥श्रीगणेशाय नमः
चिंता नुरे हरतसे मनु देह ताप।
विद्येमुळे मिळतसे यश अमाप॥
भजा हो तुम्हीविद्यारदेवदेवा।
याचीतसें तव पदीं दृढ ज्ञानठेवा॥
                                नुकतीच दि. ३ फेब्रुवारी २०१४ रोजी (माघ शुद्ध चतुर्थी) आपण श्रीगणेश जयंतीसाजरी केली.आपल्या लाडक्या गणपतिबाप्पाकडे आपण ज्ञानाचा ठेवा मागितला. श्रीगणेशाला विद्याधरविद्येची देवता म्हणतात.  श्रीगणेशाची मूर्ति खरोखरच ज्ञानदेवतेची  वैशिष्ट्ये दर्शविते का? ते पाहू या.
श्रीगणपतीच्या पायाशी असलेला उंदीर :-
गणपति मूर्तिच्या पायाशी त्याचे वाहन छोटासा उंदीर आहेउंदीर हा प्राणी छोटा असला तरी कुरतडून शेतीतील धान्याचा नाश करतो. थोडासा अहंकार कुरडून तुमच्यातील ज्ञानाचा नाश करत असतो. ही गणपतिची मूर्ति सांगते, ‘ज्ञान मिळविताना प्रथम अहंकाररुपी उंदीरावर आरुढ व्हा म्हणजे मनातील अहंकारावर मात करा’.
जानवे : साप
ह्या मूर्तिचे जानवे साप आहे. साप उंदीराचा शत्रू - उंदीर नष्ट करणारा असल्याने शेतकऱ्याचा मित्र.   तुमच्यातील अहंकार दूर करणारे मित्र, ज्ञान साधनेत तुमच्या बरोबर असावेत म्हणजे ज्ञानरुपी शेतीचे रक्षण होईल.

देह माणसाचा व मुख सर्वात बुद्धिमान प्राणी हत्तीचे :-
ह्या मूर्तिचा देह माणसाचा व मुख सर्वात बुद्धिमान प्राणी हत्तीचे ह्याचाच अर्थ ज्ञान मिळविण्यासाठी हत्तीप्रमाणे कुशाग्र बुद्धी जरुरीची आहे.
लंबोदर :-
ह्या मूर्तितील मनुष्यदेहाचे पोट मोठे आहे, म्हणून गणपतिचे एक नाव लंबोदर = लंब+ उदर= मोठे पोट असलेला. संत एकनाथमहाराजांनी ह्या मोठ्या पोटात सर्व चराचर सामाविलेले आहे, असे म्हटले आहे. ह्याचा अर्थ हत्तीच्या बुद्धीमत्तेने तुम्हाला मिळालेले ज्ञानरुप अन्न ह्या चराचरापर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व समाजास उपयुक्त झाले पाहिजे.
त्रिशुल: -
ह्या मुर्तीच्या एका हातात त्रिशुल आहे म्हणजे ज्ञानाबरोबर तुम्ही सदैव शस्त्रसज्ज असायला हवे. आपण नेहमी म्हणतो,
' भारतीयता आणि विश्वबंधुता तत्वे थोर उदार
पण दुर्बलांच्या शब्दांना मान कोण देणार ? '
पाश:-
दुसऱ्या हातात पाश आहे. हा पाश आपल्याला सांगतो आपल्या मनातील, समाजातील पाप ह्या पाशाने दूर करा.
मोदक:-
ह्या मूर्तिच्या पुढच्या  हातात मोदक आहे. मोद म्हणजे कल्याण, ज्ञानाने धनधान्य पिकवून सर्व समाजाचे कल्याण करा.

दुसऱ्या हातावर ॐ हे अक्षर आहे:-
दुसऱ्या हातावर हे अक्षर आहे ह्याचाच अर्थ ही मूर्ति सांगते मी स्वतः ॐ आहे.
ॐ ह्या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरांनी सांगितला आहे, ॐ म्हणजे अ+ +.
अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णु, कार तो महेश जाणियेला.’
अध्याय ३-यांत श्रीगुरुचरित्रकार ह्याच त्रिमुर्तिचे वर्णन करतात
ब्रह्मयाचा रजोगुण। विष्णु असे सत्त्वगुण।
तमोगुण उमारमण। मूर्ति एकचि अवधारा॥ ५२॥
ह्या सर्व वर्णनातून श्रीगुरुचरित्रकार सांगताना दिसतात, श्रीदत्तात्रेय ही एकच मूर्ति म्हणजे व्यक्ती आहे. जिच्यात तीन मूर्ति एकत्रित नसून तीन गुण एकत्रित आहेत. अशा ह्या त्रिगुणात्मक दत्तगुरुंमध्ये ब्रह्मदेवाचा रजोगुण, श्रीविष्णुचा सत्त्वगुण व श्रीशंकराचा तमोगुण एकत्रित झालेला आहे.  
श्रीदत्ताची पिढ्यांपिढ्या चालत आलेली मुर्ति ब्रह्मा, विष्णु व महेश ह्यांची तीन मुखे व  सहा हात असलेला मनुष्यदेह. ह्यातील ब्रह्मदेव रजो गुण हा सृष्टी निर्माण करणारा, विष्णु सत्त्वगुण हा त्या सृष्टीचे पालन करणारा तर महेश तमो गुण  म्हणजे तासी तापट हे तीनही गुण एकत्रित असलेली मूर्ति.
                    शंकर ह्या शब्दाची व्याख्या आहे,
यः शमम् करोति इति शंकरः
शम् म्हणजे कल्याण जो पाप नाहिसे करुन सर्वांचे कल्याण करतो तो शंकर.
 ‘श्रीगुरुचरित्रात श्रीगुरुचरित्रकारांची समाजाला भक्तीमार्गाकडे वळविण्याची तळमळ दिसून येते.
श्रीगुरुचरित्रांत सांगितलेली परमेश्वराची भक्ति  निश्चित कशी करायची?
                            
                      संत वाड़मयात आपण ईश्वरभक्तीची अनेक रुपे पहातो.
सावंता माळी कांदा, मुळा पिकवण्यात विठ्ठलाची भक्ति केली असे समजतो. कर्मयोगात तो देवाचे रुप जाणतो .
गोरा कुंभार चिखल तुडवताना विठ्ठलाचे नामस्मरण करतो.
जनाबाई दळण - कांडण करताना विठ्ठलाचे नाव घेऊन भक्ति करते.
आमचा भक्तपुंडलिक म्हणतो,
"आई बाप हे दैवत, माझे| असता माझ्या  घरी, कशाला जाऊ मी पंढरपूरी"
मातापित्यांच्या सेवेत तो विठ्ठलाचे रुप पहातो यापुढे जाऊन तो प्रत्यक्ष देव भेटीस आले, असे समजून तो विठ्ठलाला म्हणतो ,
विठ्ठला उभे रहा विट्टेवरी
अलिकडच्या काळातील उदाहरण
माई मंगेशकरांच्या देवाविषयीच्या भावना शांताबाई शेळके यांनी सुरेख काव्यबद्ध केलेल्या आहेत.
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्यासाठी देव माझा पाहत आहे

                    सावंता माळी, भक्त पुंडलिक, ना बाई, माई मंगेशकर  हे सर्व दैनंदिन जीवनात ईश्वरभक्ती करणारे कर्मयोगी.
                  काही कर्मयोगी  लोक त्यांच्या कामालाच देव मानतात.
श्रीगुरुचरित्र सांगते तुमच्या दैनंदिन जीवनातील कामे ईश्वरापर्यंत पोहोचतात.
                      सर्वसामान्य माणसाला असा कर्मयोग आचरावा किंवा अशी मानसपूजा करावी म्हणून सांगितले तर आपल्याला नक्की काय करायचे? हेच कळणार नाही. तसेच परमेश्वर तर आपण पाहिलेला नाही, आपल्याला दिसत नाही.
ह्यासाठी आपल्या पूर्वजांनी परमेश्वराच्या मुर्ती निर्माण करुन  समाजाला भक्तिमार्गाकडे  
जाण्याचा राजमार्ग दाखवून दिलेला आहे.
                   आपण घरी, देवळात देवाची पूजा- अर्चा करतो. मन, घर, देऊळ मंगलमय, प्रसन्न अनुभवतो. कोणत्याही देवतेची पूजा -अर्चा करताना, त्या मूर्तीतून प्रतित होणारे गुण समजून घेऊन आत्मसात करता आले तर खरोखरच त्या देवाची पूजा सफल झाली असे म्हणता येईल.
  उदाहरणार्थ :  श्रीदत्तात्रेयांची मूर्ति आपल्याला सांगते, प्रत्येक माणसात हे तीनही गुण (रज, सत्त्व, तम) असणे आवश्यक आहेत.
उदाहरणार्थ : आपण शेतकरी घेतला तर
तो आपल्या शेतात शेती करुन त्याची सृष्टी निर्माण करतो - ब्रह्मदेवाचे काम 
त्या शेतीला पाणी, खते घालून ह्या सृष्टीचे संगोपन करतो - श्रीविष्णुचे काम
वेळच्या वेळी निंदणी, खुरपणी करुन आलेले तण काढून टाकतो. पिकांवर पडलेली कीड वेळीच औषधांच्या सहाय्याने नष्ट करतो (अर्थात येथे केमिकल्स कमीतकमी वापरावीत).  शेतीत आलेले पाप : कीड, तण दूर करतो तमो गुणी - शंकराचे काम 
                 अशाप्रकारे आपल्या शेतीचे जर अद्ययावत ज्ञान ठेवले तर आपल्या कृषीप्रधान देशात सर्वत्र शिव म्हणजे पावित्र्य  नांदायला वेळ लागणार नाही.
गृहिणी सुद्धा आपल्या घराच्या विश्वात
आपली छोटीशी सृष्टी निर्माण करत असते, हे झाले - ब्रह्मदेवाचे काम.
ह्या सृष्टीची अन्नपुर्णा त्या घरातील गृहिणी असते, सेच सर्वांना काय हवे नको ते पाहून त्या सृष्टीचे पालन करत असते  हे झाले -श्रीविष्णुचे काम.
काही वेळेला रुद्रावतार घेऊन घरातील मुले किंवा कोणी सदस्य चुकीच्या किंवा पापाच्या मार्गाने जात असेल तर त्यांना थांबवते- शंकराचे काम
                          ही दत्तमूर्ति सांगत असलेली   वैशिष्ट्ये जरी आपण प्रामाणिकपणे आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन आपल्या संसारात वापरली तर घरात खरोखरच शिव म्हणजे पावित्र्य नांदू लागेल.
पूर्वजांनी दिलेला सगुण विविध मूर्तिंचा अमुल्य  ठेवा आपल्याला संदेश देत असतो
भाव तैसा मूर्तित देव दिसे ।
डोळस श्रद्धेत ज्ञान असे॥
॥ श्रीगुरुदेवदत्त
क्रमशः
(संदर्भ ग्रंथ :
॥श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश॥ लेखक डॉ. प्र. . जोशी

 प्रकाशक : श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश प्रकाशन, पुणे)

Sunday 9 February 2014

दैनिक सकाळ, सप्तरंग पुरवणी, नासिक - स्वागत नव्या पुस्तकाचे

॥श्री॥

नमस्कार,                                                        दि . /फेब्रुवारी /२०१४
                     आज दि. फेब्रुवारी २०१४ रोजी  सकाळ पेपर- सप्तरंग पुरवणी, नासिक यांनी स्वागत नव्या पुस्तकांचे या सदरात पान क्रमांक १४ वर शेवटच्या परिच्छेदातश्रीगुरुचरित्र आशयनिधीया मथळ्याखाली आपल्या वेबसाईटची माहिती देऊन दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मा. संपादक दैनिक सकाळ यांना मनःपूर्वक धन्यवाद.
                     आपल्या माहितीसाठी  स्कॅन केलेली सकाळ पेपरमधील  बातमी देत आहोत.
" वाचकांचा प्रतिसाद,  हाच श्रीगुरुंचा आशीर्वाद"

                           कळावे,
                                             प्रभा आठवले, नासिक
                                                             संकलक: श्रीगुरुचरित्र आशय -निधीAdd caption