२१ शतकातील सत्य
घटना:- राजकिय वर्चस्व असलेल्या घराने झोपडपट्टीत
रहाणाऱ्या सज्जन मुलाला ‘घरी काम करणाऱ्या
मुलीला त्रास दिला’ ह्या खोट्या केसमध्ये अडकविण्याचा घाट घातला. ही घटना त्या परिसरातील
काही मध्यमवर्गीय लोकांना आवडली नाही. त्यांनी निर्भीडपणे पोलीस अधिकाऱ्यास सत्य गोष्ट
सांगितली. पूर्वग्रह दूषित अधिकारी कायद्याचे पालन कठोरपणे करीत मुलाला जबरदस्त मारीत होते. परंतु मध्यमवर्गीय
नागरिकांकडून संपूर्ण सत्य कळल्यावर, पोलीस अधिकाऱ्यानी त्या मध्यम वर्गीय नागरिकांना "तुम्ही आता निश्चिंत मनाने घरी जा", असे सांगितले व ते पोलीस अधिकारी पोलिस स्टेशनमधून
बाहेर निघून गेले. रात्री १ वाजता पोलीस अधिकाऱ्याने त्या झोपडपट्टीवासीय मुलाला घरपोच
पोहोचविले.
(श्रीगुरुचरित्र-अध्याय
१४ :- श्रीगुरुंनी सायंदेवातील
आत्मविश्वास जागृत करुन त्यास यवन अधिकाऱ्याकडे पाठविले. निरपराध सायंदेव निर्भीडपणे
सामोरा आलेला पाहून, पूर्वग्रहदूषित यवन अधिकाऱ्याचे मनपरिवर्तन झाले.)