एकदा आर्य चाणक्य व चंद्रगुप्त
मौर्य यांच्यात मतभेद झाले. तेव्हा आर्य चाणक्य यांनी भर दरबारात प्रतिज्ञा केली की,
“दुसरा चंद्रगुप्त मौर्य मी तयार करीन” आणि ते दरबार सोडून निघून गेले. ही इतिहासातील
ऐकिव गोष्ट खरी असल्यास, आर्य चाणक्यांना ‘दुसरा चंद्रगुप्त मौर्य’ तयार करता आलेला
नाही, असे इतिहासात दिसते. जसा चंद्रगुप्त मौर्यसारखा शिष्य जन्मावा लागतो, तसाच जन्मजात
खेळाडू निर्माण होत असतो.
खेळाडू विद्यार्थ्यांना दहावी-बारावी
परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरते गुण देणे, खरोखरच योग्य आहे. परंतु अभ्यासू विद्यार्थ्यांची
अभ्यास व खेळ अशी रस्सीखेच कशासाठी ?
No comments:
Post a Comment