तयापासूनी
प्रदुषण प्राप्त झाले ॥
विचारी मना
तूच शोधूनी पाहे ।
तीर्थ संहिते
जल शुद्ध वाहे ॥
नदी पाहिली की, नदीच्या वहात्या खळाखळत्या पाण्यात उतरावे, मनसोक्त
आनंद घ्यावा, ह्या निर्भेळ आनंदाला पुण्यप्राप्तीची जोड असेल तर मनुष्य प्रदुषणाचा
विचार न करता, निसर्ग स्नानाकडे धाव घेतो. ह्या स्नानातून त्या
व्यक्तीला पुण्य मिळते की नदी प्रदुषणाचे पाप मिळते ?
सुमारे ६००वर्षांपूर्वी
श्रीनृसिंहसरस्वतींनी ‘गंगा स्वच्छता’ अभियानाची मुहुर्तमेढ
केलेली दिसते. अध्याय १५ मध्ये श्रीगुरु आपल्या शिष्यांना तीर्थ यात्रेची सुरवात करताना, काशीला जाऊन गंगा नदीची चाकरी करण्यास सांगतात.
श्रीगुरुंच्या नियमांनुसार, शिष्यांनी फक्त नदी संगमात स्नान करावे. दोन
-तीन नद्यांच्या संगमातील भरपूर पाण्यात प्रदुषणाची मात्रा निश्चित कमी होते.
श्रीगुरुंनी ‘नदी उगम-स्नान तसेच समुद्र-स्नान करा’ असा
संदेश शिष्यांना दिलेला नाही. निसर्गाच्या जलचक्राचे हे दोन्ही स्त्रोत प्रदुषणमुक्त
ठेवणे, आजही गरजेचे आहे.
पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असलेल्या जलाशयांमध्ये श्रीगुरुंनी शिष्यांना
स्नान करण्यास सांगितलेले आढळते.
‘खेकड्यांच्या प्रजनन काळात तसेच उन्हाळ्यात नदीचे बाष्पीभवन काळात
नदीत स्नान करु नका’, ह्या श्रीगुरुंच्या संदेशातून निसर्ग संवर्धक श्रीगुरु आपल्याला भेटतात.
२१व्या
शतकात पर्यटनशास्त्र( Tourism) पर्यावरण शास्त्र( Environmental Science) भारत भूमीचा उपग्रहांद्वारे छायांकित
झालेला भुगोल (Geography)अशी ज्ञानाची विविध
दालने समृद्ध होत असताना,
केल्याने देशाटन, जाणिवे प्रदुषण
हा अनुभव येतो.
आसामच्या निसर्गरम्य प्रदेशात प्रवेश करताना, आपली आगगाडी
ब्रह्मपुत्र नदीवरील मोठ्या पुलावरुन जात असते. ब्रह्मपुत्र नदीचे ते विशाल दर्शन डोळ्यात
साठवित असताना, सहप्रवासी श्रद्धेने नदीमध्ये १-२ रुपयांची नाणी नदीला अर्पण करीत असतात.
ब्रह्मपुत्रनदी दररोज किती नाण्यांचे प्रदुषण स्वतःबरोबर वाहून नेत असेल ?
ब्रह्मपुत्र नदीला प्राचीन काळापासून तिच्या भव्यतेमुळे
नद (पुलिंगी) म्हणतात.
ब्रह्मपुत्र नदीच्या वेगवान प्रवाहात, सर्वसामान्य मनुष्य
स्नानाचे पुण्य घ्यायला घाबरतो. परंतु ह्या नदीला नाणी-दान
करुन प्रदुषणात भर टाकतो.
ब्रह्मपुत्र नदीपासून चार हात दूर रहाणारा माणूस, विदर्भातील
लोणार सरोवर येथील सीता धारा ह्या छोट्या नदीच्या उगमात
यथेच्छ स्नान करतो. हे स्नान करताना लोणार सरोवर ह्या नैसर्गिक ठेव्यास आपण धक्का पोहोचवित असतो ! हे त्या व्यक्तीच्या गावीही
नसते.
संदर्भ:-
निसर्गदत्त लोणार सरोवर -इतिहास (भाग २)
निसर्गदत्त लोणार सरोवर -वैज्ञानिक तीर्थक्षेत्र (भाग ३)
http://shrigurucharitrabodha.blogspot.in/2014/08/blog-post.html
१५ व्या शतकात परधर्मीय जुलमी राजवटीने सर्वसामान्य
माणुस दबून गेला होता. अशा प्रदेशांमध्ये
माणसातील स्फुलिंग जागृत करण्यासाठी,
श्रीगुरुंनी आपल्या शिष्यांना पाठविलेले दिसते. त्यामुळे आसामची ब्रह्मपुत्र नदी, विदर्भातील
लोणार सरोवर अशा अनेक ठिकाणांचा समावेश श्रीगुरुचरित्रांच्या ‘तीर्थ यात्रा निरुपण’
अध्यायात नसावा.
तीर्थ संहितेतून
घडणारे भारत दर्शन :-
श्रीगुरुचरित्र आशय अध्याय १५ -
http://media.wix.com/ugd/e49ced_8ed083387cf741edb333898c94db0f6c.pdf
॥ श्रीगुरुदेवदत्त॥
श्रीगुरुचरित्र आशय अध्याय १५ -
http://media.wix.com/ugd/e49ced_8ed083387cf741edb333898c94db0f6c.pdf
॥ श्रीगुरुदेवदत्त॥
No comments:
Post a Comment