चिठ्यांची नाही झाली, अदलाबदल ।
तिच्या जीवनी आली, सर्वत्र दलदल ॥
त्या दलदलीतून मिळविले, तिने आरक्षण ।
आरक्षणाने खरेच होईल का ? तिचे रक्षण ॥
आरक्षणे न ठरावे, तिचे स्वरुप अबला ।
स्व-जाणिवेतून सिद्ध व्हावी, ती सबला ॥
आंदोलने मिळविला, तिने मंदिर प्रवेश ।
स्त्रीमुक्तीचा भासला, तिथे निव्वळ आवेश॥
स्त्रीमुक्तीचा पाया रचिला, फुले सावित्रीने ।
पिडीत स्त्रियांना आधारिले, सिंधू सपकाळने ॥
निवडणुकीतुन प्रकटावे, तिने इंदिरा गांधी ।
तयासाठी हटवावी लागेल, गुंडांची ऑंधी ॥
चिठ्यांचा खेळ संपताना, व्हावी मात ।
प्रगतिपथास लागते, परस्परांची साथ ॥
---- अनुप्रभा नाशिक
संदर्भ :-
आदरणीय अमृता प्रीतम ह्यांची 'बोला व ऐका' अशा चिठ्यांच्या खेळाची अप्रतिम हिंदी कविता.
No comments:
Post a Comment