एकदा भगवान
परशुरामानी श्रीदत्तगुरुंना विचारले,” ज्ञान कशाला म्हणायच?
त्याची लक्षणे कोणती?”
श्रीगुरुदेवांनी
आपला शिष्य परशुरामाला शिकविलेल्या त्रिपुरारहस्यात
ज्ञानाविषयी माहिती दिलेली आहे.
त्रिपुरारहस्यात
श्रीगुरुदेव म्हणतात,
ज्ञानी माणूस ओळखणे
खूप कठीण आहे. त्यासाठी ते
उदाहरण देतात, पदार्थाची चव चाखल्याशिवाय तो कसा आहे?
हे नुसते पाहून सांगता येत नाही. कोणताही ज्ञानी
माणूस हा त्याच्या कपड्यांवरुन बोलण्या- चालण्यावरुन आपल्याला
ठरविता येत नाही.
ज्ञानी माणसाचे
मन शुद्ध व साधेभोळे असल्याने, त्याला वैराग्य, चिंतन, प्रार्थना ह्या सर्व गोष्टी नैसर्गिक
असतात. वैराग्य, चिंतन, प्रार्थना ह्या
गोष्टींचे
समाजात आजही खूप अवडंबर लोक माजविताना दिसतात.
परिपूर्ण ज्ञानी
माणसावर मान-
अपमान, यश -अपयश यांचा परिणाम
होत नाही. सर्वश्रेष्ठ ज्ञानी माणूस द्विधा मनस्थिती न करता खरी
उत्तरे देऊन अत्युच्य
सत्य सांगतो.
कोणताही ज्ञानासंबंधी प्रश्न असल्यास हा ज्ञानी माणूस स्वत:हून तो सोडवतो. तो आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करीत नाही.
श्रीगुरु सांगतात
समाधानी वृती व पवित्र मन त्याच्याकडे असते. कोणत्याही संकटकाळी
त्याच्या मनाची शांती ढळत नाही.
ज्ञानी माणसाचा कष्ट
न करता जगण्याकडे कल असतो, हा दोषही श्रीगुरुदेव सांगतात.
हे सर्व गुण असलेल्या माणसाला समाजात ‘दांभिक’ म्हणतात.
आपल्यासारख्या सर्वसामान्य
माणसाला खरेच ज्ञान मिळवायचे असेल तर काय करावे?
हे श्रीगुरुदेवांनी सोप्या शब्दात
पायरीपायरीने समजावून सांगितले आहे.
दुसऱ्याला
जोखण्यात वेळ घालवू नका, म्हणजे आंधळेपणाने त्यांचे अनुकरण करु नका. कारण काही वेळेला आपल्याला अद्वितीय ज्ञानी माणसाचे गुण असलेल्या व्यक्तीत
आजुबाजूच्या परिस्थितीनुसार बदल होतो.
त्यामुळे माणसाने
स्वतः ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा.
ज्ञानी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात.
कमीतकमी मेहनतीने स्वतःला ज्ञानी म्हणविणारा माणूस आपल्या जुन्या पद्धती
अनुसरतो. त्याचे मन नवीन गोष्टींचा स्वीकार करीत नाही.
तो सर्वसामान्य माणसासारखा असतो.
( येथे श्रीगुरुदेव
आधुनिक काळाबरोबर येणारे नवीन तंत्रज्ञान शिकायला तर सांगत आहेत, असे दिसते.)
ज्ञान मिळविण्यासाठी
खूप साधा मार्ग श्रीगुरुदेव सांगतात
ज्ञान मिळविण्यासाठी
आधी आपल्या मनोदेवतेला, आपल्या मनाला शरण जा. स्वतःच
स्वतःला ओळखायला शिका.
आपण आधी आपले गुण
दोष ओळखले पाहिजेत. आपल्याला कोणत्या क्षेत्रात गती आहे ते समजले
पाहिजे. ह्यासाठी श्रीदत्तगुरु सांगतात, कोणत्याही बाह्य उपायांची किंवा दुसऱ्या व्यक्तीची गरज नसते.
(
श्रीगुरुदेवांनी सांगितलेले विचार अगदी practical आहेत.आपले आपल्याच समजते, आपली कोणत्या क्षेत्रात गती आहे? उदहरणार्थ गाणे किंवा एखादा विशिष्ठ खेळ क्रिकेट वगैरे तसेच गणित,
एखादे शास्त्र, अगदी स्वयंपाकसुद्धा
एकदा आपल्याला
आपली दिशा कळाली की आपण त्या क्षेत्रातील ज्ञान मिळवू शकतो.)
इथे म्हणावेसे वाटते,
तुझे आहे तुजपाशी
का वणवण फिरशी बाजारी ?
खरी हुशारी
ही अज्ञानाच्या बुरख्याखाली झाकलेली असते. तिचे खरे रुप हे विवेकाने
अज्ञानाचा बुरखा दूर केला असता दिसते. अर्थात हे चंचल मनाच्या
माणसाला अवघड असते.
(आपण पहातो चंचल
मनाची व्यक्ती सत्राठिकाणी क्लास लावते, व एक ना भाराभर चिंध्या
अशी स्वतःची अवस्था करुन घेते.)
ह्याचाच अर्थ
चंचल मन ज्ञान मिळवू शकत नाही त्यामुळे मनातील चंचलता प्रथम दूर केली पाहिजे.
जे लोक स्वतःच्या
मनोदेवतेला भक्तीभावाने ओळखतात. ते इतरही विचार मनांत शिरु देतात. त्यांना अज्ञानाचा स्वतःच्या मनावरील बुरखा दूर करणे सहज शक्य
होते
येथे भक्तीभाव स्वतःच्या मनाशीच वापरायचा आहे कोणत्याही
कर्मकांडाची गरज नाही.
(संदर्भ ग्रंथ :
1)The Mystery Beyond the
Trinity
Tiprura Rahasya
Translated by
SWAMI SRI
RAMANANANDA SARASWATHI
2)॥श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश॥ लेखक डॉ. प्र.
न. जोशी
प्रकाशक : श्रीदत्तात्रेय
ज्ञानकोश प्रकाशन, पुणे)
No comments:
Post a Comment