Friday, 12 June 2015

पूर्वग्रह दूषित शासक मनपरिवर्तन



२१ शतकातील सत्य घटना:-  राजकिय वर्चस्व असलेल्या घराने झोपडपट्टीत रहाणाऱ्या सज्जन मुलाला  ‘घरी काम करणाऱ्या मुलीला त्रास दिला’ ह्या खोट्या केसमध्ये अडकविण्याचा घाट घातला. ही घटना त्या परिसरातील काही मध्यमवर्गीय लोकांना आवडली नाही. त्यांनी निर्भीडपणे पोलीस अधिकाऱ्यास सत्य गोष्ट सांगितली. पूर्वग्रह दूषित अधिकारी कायद्याचे पालन कठोरपणे  करीत मुलाला जबरदस्त मारीत होते. परंतु मध्यमवर्गीय नागरिकांकडून संपूर्ण सत्य कळल्यावर, पोलीस अधिकाऱ्यानी त्या मध्यम वर्गीय नागरिकांना "तुम्ही आता निश्चिंत मनाने घरी जा", असे सांगितले व ते पोलीस अधिकारी पोलिस स्टेशनमधून बाहेर निघून गेले. रात्री १ वाजता पोलीस अधिकाऱ्याने त्या झोपडपट्टीवासीय मुलाला घरपोच पोहोचविले.
(श्रीगुरुचरित्र-अध्याय १४ :- श्रीगुरुंनी सायंदेवातील आत्मविश्वास जागृत करुन त्यास यवन अधिकाऱ्याकडे पाठविले. निरपराध सायंदेव निर्भीडपणे सामोरा आलेला पाहून, पूर्वग्रहदूषित यवन अधिकाऱ्याचे मनपरिवर्तन झाले.)

Wednesday, 10 June 2015

अभ्यासू विद्यार्थ्यांची रस्सीखेच !

                  एकदा आर्य चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य यांच्यात मतभेद झाले. तेव्हा आर्य चाणक्य यांनी भर दरबारात प्रतिज्ञा केली की, “दुसरा चंद्रगुप्त मौर्य मी तयार करीन” आणि ते दरबार सोडून निघून गेले. ही इतिहासातील ऐकिव गोष्ट खरी असल्यास, आर्य चाणक्यांना ‘दुसरा चंद्रगुप्त मौर्य’ तयार करता आलेला नाही, असे इतिहासात दिसते. जसा चंद्रगुप्त मौर्यसारखा शिष्य जन्मावा लागतो, तसाच जन्मजात खेळाडू निर्माण होत असतो.

               खेळाडू विद्यार्थ्यांना दहावी-बारावी परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरते गुण देणे, खरोखरच योग्य आहे. परंतु अभ्यासू विद्यार्थ्यांची अभ्यास व खेळ अशी रस्सीखेच कशासाठी ?

Tuesday, 9 June 2015

भावी पिढ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार ( ? )


नमस्कार,

 दहावीची परीक्षा नापास होणाऱ्यांना अकरावीत प्रवेश देणे अयोग्य आहे.
माननीय  शालेय शिक्षण मंत्री तसेच शिक्षण तज्ञ यांनी भावी पिढ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करावा, ही विनंति.